Ad will apear here
Next
‘ज्ञानार्जनाला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक’
विवेक सावंत यांचे मत; पुणे विद्यार्थी गृहात स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन
‘स्मार्ट क्लासरूम’च्या उद्घाटनप्रसंगी देवकी वळवडे, नीला पेंडसे, विवेक सावंत यांच्यासह   सुभाष जिर्गे, सुनील रेडेकर, राजेंद्र कडूसकर, आनंद कुलकर्णी, डॉ. योगेश नेरकर, डॉ. कल्याणी कुलकर्णी आदी

पुणे : ‘आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोबाइलसारख्या उपकरणाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेव्हा शिक्षकांनी अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत अध्यापन करावे. ज्ञानार्जन करताना त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर आणि आनंददायी होईल,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्मार्ट क्लासरूमचे’ उद्धाटन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश वळवडे यांच्या स्मरणार्थ देवकी वळवडे यांच्या, तसेच प्रा. अरविंद म्हसकर, ज्योत्स्ना म्हसकर यांच्या देणगीतून ही स्मार्ट क्लासरूम उभारण्यात आली आहे. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक राजेंद्र कडूसकर, संचालक आनंद कुलकर्णी, देवकी वळवडे, म्हसकर यांच्या भगिनी नीला पेंडसे, प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, उपप्राचार्या डॉ. कल्याणी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. रोबोटिक्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटच्या मदतीने ‘स्मार्ट क्लासरूम’चे उद्धाटन झाले. या क्लासरूमच्या माध्यमातून संस्थेच्या नाशिक येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत, तसेच जपान येथील माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. 


विवेक सावंत म्हणाले, ‘महाविद्यालयात ‘स्मार्ट क्लासरूम’ची सुरुवात करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. यामुळे संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. प्रवास न करता महाविद्यालयात ‘रिमोट’च्या सहायाने विषय शिकविला जाईल. वर्गात जास्ती जास्त शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. नवमाध्यमांचा नवतंत्रज्ञानाची वापर आपण सर्वजण करतो, याचा उपयोग शिक्षणप्राक्रियेत करून घेणे आवश्यक आहे. आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये अडीच लाख पेटंट आहेत. याचा उपयोग अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करता येईल. तेव्हा स्मार्ट क्लासरूम अधिकाधिक स्मार्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनीदेखील कोणत्या गोष्टीत गती आहे हे ओळखून पुढची वाटचाल करावी. आता स्पर्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत आहे, हे लक्षात घेऊन पुढे पाऊल टाका.’

वळवडे म्हणाल्या, ‘अविनाश वळवडे हे नेहमी भविष्याचा विचार करायचे म्हणून त्याच्या स्मरणार्थ ‘स्मार्ट क्लासरूम’ साकारण्यात आली याचा आनंद आहे. ते शिक्षण क्षेत्रासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच झटत राहिले. या क्लासरूमच्या रूपाने त्यांचे शिक्षणकार्य निरंतर सुरू राहील. विद्यार्थ्यांनी या ‘स्मार्ट क्लासरूम’च्या मदतीने शिक्षण घेत प्रगती करावी.’

सुनील रेडेकर यांनी ‘स्मार्ट क्लासरूम’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्न आणि योगदानाविषयी माहिती दिली. प्रा. वैदही सोहनी,  प्रा. निकिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश नेरकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZRJCE
Similar Posts
‘बौद्धिक संपदेबाबत भारतीयांनी सजग राहायला हवे’ पुणे : ‘भारतीय लोकांची बुद्धिमत्ता पाहता आपल्याकडे सर्वाधिक पेटंट असायला हवेत; परंतु जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी पेटंट आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा,
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ विषयावर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवारी, २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे
‘बौद्धिक संपदा व पेटंट’ विषयावर प्रा. हिंगमिरे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘नवीन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ या विषयावर प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘प्रत्यक्ष अनुभव व कामातून ज्ञानप्राप्ती ही रोजगारक्षमतेची किल्ली’ पुणे : ‘आज आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान आणि ठोकताळे यांवर आधारित शिक्षण दिले जाते मात्र रोज येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपली शिक्षण पद्धती तितकीशी सक्षम नसून, ती बदलत महात्मा गांधी यांची ‘नयी तालीम’ अर्थात प्रत्यक्ष कामातून अनुभूती व त्या अनुभूतीमधून ज्ञानाची प्रचीती याचे अनुकरण केले गेले पाहिजे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language